श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक चवथा : नवविधा भक्ति-२

१.अनुभव घेत असता संगत्याग होत नाही, कारण अनुभव घ्यायचा म्हणजे अनुभव,अनुभविता,अनुभाव्य ही त्रिपुटी उत्पन्न होते. संगत्याग करताच अनुभव असा शब्द उरत नाही.अहंभाव नाही तर मग अनुभव कुठला? सारांश या गोष्टी अनुभवीच जाणतात, इतराना हा सारा गोंधळच वाटणार !

२. ’पाहणारा, पाहण्याची क्रिया, जे पाहायचे ते’ म्हणजेच ’दृष्टा,दृश्य,दर्शन’ पाहणारा जो आहे त्याच्या स्वरुपात लीन झाले की समाधान मिळणारच, सद्‍वस्तु - परब्रह्म लाभ होणारच !

No comments:

Post a Comment